संगमनेर – जीवनाचे ध्येय मानून आमदार यांनी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. आमदार थोरात यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच निळवंडे कामी कोणतेही योगदान नसलेल्या राधाकृष्ण विखे यांना पाणी सोडण्याची संधी मिळाली असल्याची टीका निळवंडे पाट पाणी कृती समितीचे गंगाधर गमे, शंकर घोरपडे, ज्ञानेश्वर वरपे यांनी केली आहे.
निळवंडे कृती समितीच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, 1999 मध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनी या कामाला गती दिली. आदर्शवत पुनर्वसन केले. संगमनेर तालुक्यात पुनर्वस्तग्रस्तांना जमिनी दिल्या. अनेकांना चांगल्या नोकऱ्या दिल्या. तालुक्यात त्यांना सन्मानाची वागणूक मिळत आहे. सरकारमधून सातत्याने मोठा निधी मिळून कालव्यांची कामे मार्गी लावली.
2014 ते 19 या काळात कालवे पूर्ण बंद होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येतात पुन्हा मोठा निधी मिळून रात्रंदिवस कामे सुरू ठेवली. ही कामे सर्व आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केली आहे. या कामांमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कायम अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. कालव्यांमध्ये स्वतःच्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. वृक्षारोपण केले, कालवे होऊ नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या विखेंचे या कामी कोणतेही योगदान नाही हे सर्वश्रुत आहे. कालव्यांच्या कामासाठी मागणी करणाऱ्या आंदोलकांना विखेंनी लाठीमार केला आहे.
आडकाठी आणणाऱ्यांकडून श्रेयाचा प्रयत्न
निळवंडेला आडकाठी करणारेच निळवंडेचे श्रेय घेऊ पाहत असेल तर 182 गावांतील दुष्काळी जनता कधीही सहन करणार नाही, असा खणखणीत इशाराही निळवंडे पाठवा आणि कृती समितीच्या वतीने देण्यात आला.