नगर – नगरचे नाव अहिल्यादेवी नगर न करता अंबिकानगरच करावे. सन 1995 मध्ये नगरच्या सभेत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरचे नाव बदलून अंबिकानगर केले होते. त्या घोषणेला मुख्यमंत्री शिंदे यांनी हरताळ फासला आहे. केवळ मतांच्या राजकारणापायी शिवसेनाप्रमुखांचा आदेश मानत नाही. त्यांचे नेतृत्व अमान्य करता आहात का? असा खोचक सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.
नगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरणाची घोषणा केली. यासाठी आपण सामान्य नगरकरांना विश्वासात घेतले होते का? केवळ धनगर समाजाची मते पदरात पाडून घेण्यासाठी अहिल्यादेवीनगर करण्याचा घाट घालण्यात आला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वाचे आहे. धनगर समाजाच्या भावनेचा आदरच करतो. राजकीय पोळी न भाजता अहमदनगरचे नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अंबिकानगर करावे, असे आवाहन जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना केले.