मुंबई – विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. अशी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर जोरदार टिका केली आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करु, शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपाल कोश्यारी व भारतीय जनता पक्षाला आवडो वा ना आवडो जयजयकार कोणीही थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज व महात्मा फुले तसेच सावित्रीमाईंबद्दल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही. असेही पटोले म्हणाले.
राज्यपाल यांनी राजभवनला भाजपचे कार्यालय बनविले आहे. भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे देखील नाना पटोले म्हणाले.
पुढे नाना पटोले म्हणाले की, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. हे अधिवेशन पूर्णवेळ चालेल परंतु भाजपा जाणीवपूर्वक गोंधळ घालून त्यात अडथळे आणत असेल तर त्यांना जनता माफ करणार नाही.
मंत्री नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीने पक्षाला दिलेला देणगीचा पैसा कसा चालतो? इक्बाल मिर्ची भाजपाचा नातेवाईक आहे का: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले pic.twitter.com/7I8iBQTFNS
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 3, 2022
तसेच मंत्री नवाब मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीने पक्षाला दिलेला देणगीचा पैसा कसा चालतो? इक्बाल मिर्ची भाजपाचा नातेवाईक आहे का ? असा सवाल देखील नाना पटोले यांनी भाजपाला केला.