नवी दिल्ली – भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू इरफान व युसुफ पठाण या बंधूंनी देशाप्रती असलेले प्रेम आणि आपली जामाजिक बांधीलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या दोघांनी करोनाचा धोका वाढल्यानंतर स्थानिक नागरिकांना मोफत मास्कचे वाटप केले होते.
करोनाचा धोका वाढत असताना याच समाजाप्रती आमचे दायित्व आम्ही जाणतो, त्यामुळेच ज्यांना रोज दोनवेळच्या जेवणाचाही प्रश्न आहे अशा गरजवंतांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे, असे इरफानने सांगितले.