देशभरात करोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वांना घरातच राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत एकेकाळी भारतीय टेलिव्हिजनवर राज्य करणाऱ्या काही जुन्या मालिका पुन्हा सुरू करण्याचा प्रयोग यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे. दूरदर्शनने “रामायण’, “महाभारत’ पुन्हा सुरू केले. जुन्या मालिका पुन्हा सुरू होणाऱ्या यादीमध्ये आता आणखी दोन नाव जोडली जाणार आहात.
या कॉमेडी मालिकांनी 90 चं दशक खूप गाजवले होते. त्यांचे अनेक एपिसोड पायरेटेड वेबसाइट्सवर सुद्धा लीक झाले होते, इतकी प्रसिद्धी या मालिकांना मिळाली होती. तर या प्रसिद्ध कॉमेडी सिरियल्स म्हणजे, “खिचडी’ आणि ‘साराभाई vs साराभाई’! या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होणे म्हणजे अनेकांसाठी पर्वणीच आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर समोर आलेल्या वृत्तानुसार हे दोन्ही शो टीव्हीवर जोरदार कमबॅक करणार आहेत. “खिचडी’ आणि “साराभाई vs साराभाई’ पुन्हा सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा देखील सोशल मीडियावर करण्यात आली आहे. या दोन्ही मालिका 6 एप्रिलपासून प्रसारण करण्यात येणार आहे. साराभाई कुटुंबीयांची भेट होणं अनेकांना आनंद देणारी बाब आहे.