ब्रिस्बेन – भारत व ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंना झालेल्या दुखापती हा जास्तीत जास्त टी-20 क्रिकेट खेळल्यामुळेच झाल्या आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचे प्रमुख प्रशिक्षक व माजी कसोटीपटू जस्टिन लॅंगर यांनी व्यक्त केले आहे.
यंदाच्या मोसमात केवळ भारतीय संघच नव्हे तर ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनाही दुखापतींचा फटका बसलेला आहे. दरवर्षी टी-20 क्रिकेटचे वेळापत्रक तसेच आयपीएल स्पर्धेचा आराखडा अन्य मालिका लक्षात घेऊन केला गेला तरच खेळाडूंना आवश्क आराम मिळेल. तसेच त्यांना जरी काही दुखापती झाल्या तरी त्यातून पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठीपुरेसा वेळही मिळेल व त्यांना देशाकडूनही खेळता येईल, असेही लॅंगर म्हणाले.
महंमद शमी, लोकेश राहुल व उमेश यादव यांना दुखापतींमुळे मालिका अर्धवट सोडावी लागली. त्यातच रवींद्र जडेजा, हनुमा विहारी व जसप्रीत बुमराह यांनाही दुखापत झाल्याने त्यांनाही मालिकेतून माघार घ्यावी लागली. हे सगळे अती प्रमाणात टी-20 क्रिकेट खेळल्यामुळेच होत आहे, असेही ते म्हणाले.