मुंबई – भारतीय संघातील तीन खेळाडूंसह एकूण सहा सदस्य करोनाबाधित असल्याचे समोर आल्यावर वेस्ट इंडिज विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही धोक्यात आली आहे. इतकेच नव्हे तर एकीकडे या मालिकेवर स्थगितीचे तसेच मालिका लांबणीवर पडण्याचे सावट निर्माण झाले असले तरीही बीसीसीआय मात्र राखीव खेळाडूंचा समावेश करता येईल, असे सांगत मालिकेसाठी आश्वासक असल्याचे दिसत आहे.
यजमान भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्याच्या 72 तास आधी भारतीय संघाच्या सुरक्षेसाठी बायोबबल असतानाही करोनाने त्यात एन्ट्री केली व मालिकाही धोक्यात आली आहे. भारतीय संघातील शिखऱ धवन, ऋतुराज गायकवाड व नवदीप सैनी या तीन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफचे चार सदस्य मिळून एकण 7 जणांना करोनाची बाधा झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले होते. मात्र, बीसीसीआयने तातडीने मयंक आग्रवालचा संघात सहभागी केले आहे.
संघातील प्रत्येक खेळाडूला अहमदाबादमध्ये दाखल होण्यापूर्वी आरटी पीसीआर चाचणी करण्यास सांगितली होती. जर ही चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांची आरटी पीसीआर सोमवारी करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आली होती. यात भर म्हणून क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि सुरक्षा अधिकारी बी लोकेश यांची देखील आरटी पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली.
दरम्यान, ऋतुराज गायकवाड याचा देखील करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तो पहिल्या चाचणीच्या फेरीवेळी निगेटिव्ह आला होता. संघातील खेळाडू आणि सदस्य करोना पॉझिटिव्ह होण्याचे सत्र अहमदाबादमध्ये केलेल्या चाचणीतही खेळाडू पॉझिटिव्ह आला होता. याच चाचणीत श्रेयस अय्यर आणि मसाज थेरपिस्ट राजीव कुमार यांची आरटी पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. हे दोघेही पहिल्या दोन फेऱ्यात निगेटिव्ह आले होते. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक करोना बाधितांची काळजी घेत आहे. ते जोपर्यंत पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत ते विलगीकरणात राहतील, असे बीसीसीआयने सांगितले आहे.