मुंबई :- भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
नाणेफेकीपूर्वी, दोन भारतीय खेळाडूंना (शुभमन गिल आणि शिवम मावी) T20 संघाची कॅप देण्यात आली. हे दोन्ही खेळाडू आज भारतासाठी पहिला T20 सामना खेळत आहेत.
T20 विश्वचषकात भारतासाठी आश्चर्यकारक कामगिरी करणारा अर्शदीप सिंग हा सामना खेळत नाहीए. त्यांच्या जागी शिवम मावीला संधी देण्यात आली आहे. अर्शदीपच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी कमकुवत झाली आहे.
भारतीय संघ : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.
1ST T20I. India XI: S Gill, I Kishan (wk), S Yadav, S Samson, Hardik Pandya (c), A Patel, D Hooda, H Patel, S Mavi, Y Chahal, U Malik. https://t.co/VusD2RXZFT #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 3, 2023
श्रीलंकेचा संघ: पथुम निसांका, कुशल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डिसिल्व्हा, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, कसून रजिथा, दिलशान मदुशानका.
Your playing XI vs 🇮🇳#INDvSL pic.twitter.com/Yh47fR365K
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) January 3, 2023
दरम्यान, श्रीलंका संघ कादगावर कमकुवत दिसत असला तरीही याच संघाने यंदाची आशिया करंडक स्पर्धा जिंकलेली होती. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ भारतीय संघाला होणार असला तरीही टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकते त्यामुळे ही मालिका रंगतदार ठरेल यात शंका नाही.