नवी दिल्ली :- राष्ट्रीय नागरिकत्व पट (एनआरसी) आणि सुधारीत नागरिकत्व कायद्याला देशभर होणरा विरोध पाहता भारतीय जनता पक्ष याबाबत मवाळ भूमिका घेईल, अशी अटकळ राजकीय वर्तुळात व्यक्त होत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी #IndiaSupportsCAA हा हॅशटॅग वापरून ट्विटरवर मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरच आता भारतीय जनता पक्ष आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
छळ सहन केलेल्या निर्वासितांना नागरिकत्व मिळणार असल्याने मी का कायद्याचे समर्थन करतो. या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही, असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.हा हॅशटॅग शेअर करा आणि का कायद्याला पाठींबा द्या असेही मोदी यांनी म्हटले आहे.