नवी दिल्ली – भारत जगामध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र, रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागले आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले आहेत. मात्र तरीही भारताने नव्या जोमाने ही चांद्रयान मोहीम हाती घेतली आणि ती पूर्ण करण्यासाठी आपला देश सज्ज झाला आहे.
भारताची चंद्र मोहीम म्हणजेच चांद्रयान-3 आज संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश बनेल.
चांद्रयान-3 चा लँडर-रोव्हर चंद्रावर 1 दिवस काम करेल, जे पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचे आहे. इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशाच्या आशा आहेत. चांद्रयान-3 ने संपूर्ण देशाला एकत्र केले आहे. मंदिरांमध्ये प्रार्थना होत आहेत. मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात येत आहे. चांद्रयान-३ बद्दल संपूर्ण देश उत्सुक आहे. चला जाणून घेऊया चांद्रयान-३ शी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे…
चांद्रयान-३ मिशन फक्त दक्षिण ध्रुव south pole of moon परिसरातच का पाठवले?
– चंद्राचे ध्रुवीय प्रदेश इतर प्रदेशांपेक्षा बरेच वेगळे आहेत. येथे असे अनेक भाग आहेत जेथे सूर्यप्रकाश कधीही पोहोचत नाही आणि तापमान -200 अंश सेल्सिअसच्या खाली जाते. अशा स्थितीत शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की बर्फाच्या रूपात अजूनही येथे पाणी असू शकते. भारताच्या 2008 चांद्रयान-1 मोहिमेने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याची उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळेच चांद्रयान-३ south pole of moon परिसरातच पाठवले जाणार आहे.