नवी दिल्ली – आयसीसीच्या फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत भारतीय महिला संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेच्या अखेरच्या सामन्यात शेफालीने 30 चेंडूत 60 धावा केल्या. या कामगिरीचा तिला गुणतालिकेत लाभ झाला. शेफालीचे 776 गुण झाले आहेत. तिच्यासह स्मृती मानधनासुद्धा क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर कायम राहिली आहे.
भारताची डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजांच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 13 व्या स्थानी झेप घेतली आहे. वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीनेही 15 स्थानांच्या प्रगतीसह 56 वे स्थान मिळवले आहे.