पाॅटचेफस्ट्रूम (द.आफ्रिका) : सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि अथर्वा अन्कोलेकरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षाखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात आॅस्ट्रेलियासमोर विजयासाठी २३४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
https://twitter.com/cricketworldcup/status/1222120893742272514?s=19
आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर भारतीय संघाने फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २३३ धावा केल्या. भारताचे प्रमुख फलंदाज दिव्यांश सक्सेना (१४), तिलक वर्मा (२) आणि प्रियम गर्ग (१५) हे लवकर बाद झाले. त्यानंतर यशस्वी जैस्वालने ६२, सिध्देश वीरने २५, रवी बिश्नोईने ३० आणि अथर्वा अन्कोलेकरने नाबाद ५५ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २३३ पर्यंत नेली.
Yashasvi Jaiswal’s 62, Atharva Ankolekar's unbeaten 55 guide India U19 to 233/9 against Australia U19 in the #U19CWC quarterfinals.
Will the India U19 bowlers manage to defend the total? 🤔🤔
Follow it live 👉👉 https://t.co/7oEwkycsgb#INDvAUS pic.twitter.com/CJ9VTSaiNM
— BCCI (@BCCI) January 28, 2020
आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत कोरी कैली आणि टाॅड मर्फीने प्रत्येकी २ गडी बाद केले तर मैथ्यू विल्लंस, कोन्नोर सुली आणि तनवीर संघने प्रत्येकी १ गडी बाद केला.