नाव न घेता परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांची पाकिस्तानवर टीका
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हे भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी पाकने आपल्या कुरापती सुरू केल्या आहेत. याचीच दखल घेत भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव न घेता एका देशाला सोडून भारताचे सर्वच देशांसोबत चांगले संबंध असल्याची टीका पाकवर केली आहे.
जागतिक स्तरावर इतर देशांसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी आयोजित चर्चासत्रात भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी प्रतिनिधीत्व केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानसोबत असलेल्या भारताच्या संबंधावर भाष्य केले. भारताचे जागतिक स्तरावर सर्वच देशांसोबत चांगले संबंध आहेत त्याचा फायदा वेळोवेळी भारताला झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार केला तर एक देश सोडून भारताचे सर्वच देशांसोबत सहकार्याचे आणि चांगले संबंध असल्याचे पाकचे नाव न घेता त्यांनी पाकिस्तानवर टीका केली. तसेच भारताने कलम 370 रद्द केल्याचा मुद्दा अमेरिकेसोबत चर्चीला गेला नसल्याचे स्पष्टीकरणही यावेळी त्यांनी दिले. तसेच काश्मीरचा मुद्दा एका वेळेसाठी बाजूला ठेवला तर भारताचे सर्वच देशांसोबत व्यापार आणि शांततेचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटनेचे कोणतेही नियम लागू होत नव्हते त्यामुळे राज्यातील जनता विकासापासून दूर राहिली होती यासर्व गोष्टीचा विचार करूनच भारताने काश्मीरविषयीचा धाडसी निर्णय घेतला. परंतू, राज्यातील ह्या परिस्थितीचा काही देशांना मागमूस नव्हता म्हणून आमच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करण्यात आला असल्याचेही जयशंकर यांनी म्हटले.