लंडन – महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारताने इंग्लंडला 8 धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, इंग्लंडचा डाव 140 धावांवर रोखला गेला. या सामन्यात नॅट स्किवर, हेदर नाइट आणि सोफिया डंकलेया इंग्लंडच्या तीन फलंदाज धावबाद झाल्या.
इंग्लंडकडून टॅम्सिन आणि हेदर या जोडीने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मात्र, दीप्ती शर्माने टॅम्सिनला पायचीत करत संघाचा विजय दृष्टिपथात आणला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून टम्सिनने 50 चेंडूत 59 धावांची खेळी केली.
शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 70 धावांची सलामी दिली. मानधना लवकर बाद झाल्यावर तडाखेबंद खेळी करणाऱ्या शेफालीचे अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले. तिने 38 चेंडूत 48 धावा केल्या. या खेळीत 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.