त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना आज पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (TOSS) वेस्ट इंडिजच्या बाजूनं लागला आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रेथवेटने नाणेफेक (TOSS) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, डॉमिनिका येथे खेळली गेलेली पहिली कसोटी टीम इंडियाने एक डाव आणि 141 धावांनी जिंकली होती. तसेच 2016 पासून उभय संघांमधील दोन कसोटी सामन्यांची ही चौथी मालिका असून यामध्ये आठपैकी सात कसोटी सामने भारताने जिंकले आहेत.