India vs Australia 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. टीम इंडियाने येथे आतापर्यंत एकूण 3 टी-20 सामने खेळले आहेत. आता ती चौथ्या सामन्यासाठी रविवारी मैदानात उतरणार आहे.
तिरुअनंतपुरममध्ये भारताने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यांनी 2 सामने जिंकले असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर भारताने पहिला टी-20 सामना नोव्हेंबर 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तो 6 धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. हा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होता. टीम इंडियाने शेवटचा टी-20 सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आणि 8 गडी राखून विजय मिळवला. हा सामना सप्टेंबर 2022 मध्ये झाला होता.
महत्त्वाची बाब म्हणजे, या मैदानावर शिवम दुबेने भारतासाठी अर्धशतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक झळकावले आहे. सूर्याने 33 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. शिवमने 30 चेंडूत 54 धावा केल्या होत्या. केएल राहुल आणि विराट कोहली यांनीही येथे टी-20 सामने खेळले आहेत. टीम इंडियासाठी सूर्या पुन्हा एकदा या मैदानावर आपली ताकद दाखवणार आहे.
दरम्यान, विश्वचषक 2023 च्या फायनलनंतर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिला सामना भारताने 2 गडी राखून जिंकला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 80 धावांची खेळी केली होती. तर इशान किशनने 58 धावा केल्या होत्या.