काबुल : अफगानिस्तानावर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणींसमोर दुसरेच मोठे संकट उभे राहिले आहे.
यातच तालिबान्यांविरोधात जगभरातून विरोध दर्शविण्यात येत आहे. अनेकांकडून अफगाणी लोकांप्रती चिंता व्यक्त केली जात आहे. तर भारतात मात्र काहींनी तालिबानी लोकांची तुलना थेट हिंदूंशी केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री स्वराने केलेल्या एका पोस्टमध्ये तालिबानची तुलना हिदुत्वाशी केली आहे. असं विधान केले आहे. तिच्या नंतर आता प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांनी तालिबान प्रकरणावरुन वादग्रस्त विधान केल्यानं अनेकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा
‘भारतातील उत्तरप्रदेशात काही कमी तालिबानी नाही आहेत. तेथे केवळ मुस्लीम नाही तर हिंदू तालिबानीही आहेत. दहशतवादी फक्त मुस्लीम असतो का? तो हिंदूही असू शकतो. महात्मा गांधी साधे होते. तर नथुराम गोडसे तालिबानी होता. ‘ असेही ते म्हणाले आहे.