नवी दिल्ली – येत्या दोन वर्षात भारतामधील रस्त्यांचे जाळे आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अमेरिकेच्या दर्जाचे करण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी यांनी राज्यसभेत कॉंग्रेस खासदार एल. हनुमंथैय्या यांच्या प्रश्नावर उत्तर देत होते. त्याचवेळ रिस्ते अपघातातील मृतांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे, असे स्पष्ट केले.
गडकरींनी यावेळी भारतात रस्त्यांचे मोठे जाळे उभारणे ही सध्या एकमेव समस्या नसल्याचे सांगून रस्ते उभारणी तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, लोकांमध्ये जनजागृती आणि शिक्षण हे देखील मुद्दे यामध्ये महत्त्वाचे ठरतात, असे ते म्हणाले.
हे. राष्ट्रीय महामार्गांवर वाढणारी अपघातांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांचे रूंदीकरण ही केंद्र सरकारसाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्यासाठीच रस्ते वाहतूक मंत्रालय प्रयत्न करत आहे. दरवर्षी देशात रस्ते अपघातात तब्बल दीड लाखांहून जास्त लोक मृत्यूमुखी पडतात.
एखाद्या युद्धात मरण पावणाऱ्या लोकांपेक्षा हा आकडा मोठा आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी असे “ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित करण्यात आले आहेत, जिथे एकाच ठिकाणी एकाहून अधिक अपघात होतात. त्यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत, असे गडकरींनी यावेळी सांगितलं.