नवी दिल्ली– लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अगदी मतदान तोंडावर आले असताना इतर पक्षांच्या नेत्यांची भारतीय जनता पार्टीमध्ये घाऊक आयात सुरू आहे. कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय राष्ट्र समिती अशा सगळ्याच पक्षांच्या जवळपास ३४ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत मिशन ३७० चे टार्गेट ठरवले आहे व त्याकरता ही आयात सुरू आहे का अशी चर्चा आहे.
भाजपमध्ये दाखल होणाऱ्यांत सगळ्यांत जास्त कॉंग्रेस नेत्यांचा भरणा आहे. गेल्य ७२ तासांतच गौरव वल्लभ आणि विजेंद्र सिंह यांनी भाजपचा हात पकडला आहे. त्या अगोदर नवीन जिंदाल, प्रणीत कौर आदी बड्या कॉंग्रेस नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम केला आहे. महाराष्ट्रात संजय निरूपम या मुंबईच्या माजी अध्यक्षांनीही पत्रकार परिषद घेत आणि कॉंग्रेस नेतृत्वावर तोफ डागत पक्षाला रामराम केला आहे. कॉंग्रेसच्या १६ नेत्यांनी भाजपचा हात पकडला आहे. केवळ प्रमुख राजकीय पक्षच नाही तर अनेक अपक्षही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. Lok Sabha elections|
भारत राष्ट्र समितीचे ८, आम आदमी पार्टीचे २, युवजन श्रमिक रायथु कॉंग्रेस पार्टीचे २, बीजू जनता दल, बसपा, झारखंड मुक्ती मोर्चा, तेलगु देसम पार्टी आणि तृणमुल कॉंग्रेसचा प्रत्येकी १ नेता भाजपमध्ये सहभागी झाला आहे. Lok Sabha elections|
२०१९ ची पुनरावृत्ती
निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी पक्ष बदलण्याचा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी म्हणजे २०१९ मध्येही असेच झाले होते. मागच्या निवडणुकीत भाजपने ४३७ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यात इतर पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या २३ नेत्यांचा समावेश होता. यातील १३ जणांना विजय मिळाला होता. यातील सगळ्यांत जास्त ८ जण उत्तर प्रदेशात विजयी झाले होते. तीन जण प. बंगालमधून तर महाराष्ट्र आणि हरियाणातून प्रत्येकी एकाचा विजय झाला होता.
हेही वाचा:
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय सिंह यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; म्हणाले, ‘केजरीवाल यांना..’