नागपूर – जिल्ह्यात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 70 टक्के पूर्ण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना पाठविला आहे.
हा प्रस्ताव मान्य झाल्यास नागपूर जिल्ह्यातील वेळेची बंधने हटणार आहेत. राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार लशींचा दुसरा डोस टक्केवारी 70 टक्के पूर्ण करणारा जिल्हा परिशिष्ट अमध्ये येत आहे. निर्बंध शिथिल करण्यात येतात.
त्यासाठी नागपूर जिल्ह्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून लसीकरणाची टक्केवारी पहिला डोस घेणारे 99 टक्के आणि दुसरा डोस घेणारे 70 टक्के झाली. त्यासोबतंच करोना बाधितांची संख्या घटत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 7 टक्क्यांपेक्षा खाली आला. येत्या सोमवारपासून नागपुरातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.