कोल्हापूर(प्रतिनिधी) : आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे कोल्हापूर शहराबरोबरच डोंगर घाट माथ्यावरती जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. तर राजाराम सह आणखीन तीन बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत.
पंचगंगेवरील राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दोन दिवसांत चार फुटाने पाणी पातळीत वाढ झाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील राधानगरी धरणात ९०.२० दलघमी पाणीसाठा आहे. आजच्या अहवालानुसार कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी व रुई असे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ३३.३७ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ७०.९८४ इतका पाणीसाठा आहे.