‘Oh! Jaipur’ । प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत यश संपादन करणे हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. खऱ्या मनाने ध्येय गाठायचे असेल तर त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. आज आम्ही तुम्हाला अशीच एक यशोगाथा सांगणार आहोत, ‘राधा गोविंद’ ज्यांनी आपल्या आयुष्यापासून हरले होते, पण त्यांनी हार मानली नाही कारण त्यांच्या आयुष्यात असे काहीसे घडले. त्यामुळे त्यांनी आपली विचारसरणी बदलली आणि आज कोट्यवधींचा व्यवसाय निर्माण केलाय.
‘ओहो ! जयपुर’ चे संस्थापक ‘राधा गोविंद’ ‘Oh! Jaipur’ ।
आयुष्याच्या सुरुवातीला राधागोविंदच्या बालपणात, त्यांच्या कुटुंबाला दोन वेळचे जेवणही मिळत नव्हते. जयपूरमध्ये त्यांच्या कुटुंबाचा छापाईचा पारंपरिक व्यवसाय होता. त्यांचे आजोबा, पणजोबा हाच व्यवसाय करायचे. पण काळानुसार परिस्थिती बदलत गेली आणि हा व्यवसाय मागे पडला. पण आपल्या आजोबांचा व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्धार राधा गोविंद यांनी केला. त्यानुसार त्यांनी यासाठी काम सुरु केले.
गरिबीत काढले दिवस
आधुनिक युगात कालबाह्य झाल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यातकुटुंबासमोर उदरनिर्वाह करण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्यावेळी राधा गोविंद अवघ्या 7 ते 8 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या घरी लोक उधारी मागणीसाठी येऊ लागले. गरिबी इतकी पोहोचली की त्याच्या आईला इतरांकडे अन्न मागावे लागले. यासर्व गोष्टींचा राधा गोविंद यांच्या बालमनावर खूप परिणाम झाला. या सगळ्या गोष्टीचा त्यांना खूप त्रास झाला. घरची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती. शाळेची फी न भरल्यामुळे त्याचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले.
17 रुपयांत दुकान उघडले
या सर्व प्रकाराने हताश होऊन राधा गोंविद घरातून पळून गेले, पण पुढे काहीच मार्ग न दिसता तो घरी परतले. मुलगा घर सोडून गेल्याचा आईला मोठा धक्का बसला होता. आईची ही अवस्था बघून त्यांनी आपले नशीब बदलण्याची शपथ घेतली. त्यानंतर त्याने आपल्या पिगी बँकेत साठवलेले पैसे गोळा केला. त्यात फक्त 17 रुपये निघाले. हेच 17 देऊन एक छोटेसे दुकान उघडले, ज्यामध्ये त्याने चॉकलेट आणि बिस्किटे विकण्यास सुरुवात केली. मात्र, याचाही त्याला फारसा फायदा झाला नाही. त्यानंतर ते मुंबईला गेले. यावेळी त्याने स्टेशनवर काही रात्र काढल्या आणि जवळून जाणाऱ्या लोकांकडे नोकरीची भीक मागितली. पडेल ती कामं त्यांनी या काळात करण्यास सुरवात केली.
लोकांमध्ये मागणी आहे ‘Oh! Jaipur’ ।
त्याचप्रमाणे हळूहळू रात्रंदिवस मेहनत करून भरपूर पैसे कमावले आणि सुमारे 50 हजार रुपये घेऊन गावी परतले. तिथे 2015 मध्ये गावातील कारागिरांकडून कपडे बनवायला सुरुवात केली. जी तो मुंबईत नेऊन विकायचा. या कपड्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते हाताने बनवले गेले. त्यामुळेच ते कपडे लोकांना खूप आवडत होते. यासोबतच ते अत्यंत कमी दरात कपडे विकायचे, त्यामुळे त्याला जास्त नफा मिळू लागला.
10 वर्षांत त्यांनी ‘ओहो जयपूर’ कंपनी सुरू केली. ज्यांचे 4 आऊटलेट त्यांनी मुंबईत उघडले. एवढेच नाही तर त्यांची अवस्था समजून त्यांनी गरजूंना कामालाही लावले आहे. आज त्यांच्या मेहनतीमुळे मुंबईसारख्या महानगरात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. आज ‘ओहो ! जयपुर’चे मुंबईत अनेक दुकाने उघडली गेली आहेत.
राधा गोविंद यांचा 8 कोटींचा टर्नओव्हर
रिपोर्ट्सनुसार, राधा गोविंद यांचे वार्षिक उत्पन्न 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या कपड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. करोडोंच्या कंपनीचे मालक असूनही ते साधे आयुष्य जगतात. यासोबतच आयुष्यात गरिबीचे चटके सोसलेले राधागोविंद नेहमी गरिबांना मदत करतात. त्यांच्या याच मदतीच्या वृत्तीमुळं अनेक गरजू लोकांचे आयुष्य बदलून गेलं आहे.