नागरिकत्व विधेयकावरून भारताकडून पाकिस्तानला खडेबोल
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला मंजूरी दिल्यानंतर देशासह परदेशातही या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला जात आहे. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील या विधेयकावर वक्तव्य करून भारताचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दरम्यान, पाककडून आलेल्या वक्तव्याचा आता भारताने चांगलाच समाचार घेतला आहे.
Rajiv K Chander: Citizens of India don’t need anyone else to speak on their behalf, least of all those who have built an industry of terrorism based on the ideology of hate. It would serve PM Khan and his country well, if he focuses on the welfare of his own people and country. pic.twitter.com/0sHYatBRyQ
— ANI (@ANI) December 18, 2019
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजीव चंदर यांनी इम्रान खान यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. पाकिस्तान मानवाधिकाराचा समर्थक असल्याचा आव आणतो. परंतु पाकिस्तानात मध्ये अल्पसंख्यांकांची संख्या टक्के होती. परंतु आता ती टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तामधील काही कायदे, अल्पसंख्यांकांचा होणार छळ आणि सक्तीचं धर्मांतरण हे यामागील प्रमुख कारण असल्याचं ते म्हणाले.
भारतातील नागरिकांसाठी आणखी कोणी बोलण्याची गरज नाही. कमीत कमी द्वेषाच्या आधारावर ज्यांनी दहशतवादाचा उद्योग चालवला आहे, त्यांनी तरी यावर बोलू नये. आपला देश आणि देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणे हे इम्रान खान यांच्यासाठी चांगले असेल, असेही राजीव चंदर यांनी नमूद केले. दरम्यान, भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे दक्षिण आशियाई क्षेत्रात शरणार्थ्यांची मोठी समस्या तयार होत असल्याचे इम्रान खान म्हणाले होते. यावर भारताने तीव्र शब्दात निषेध करत आपला देश सांभाळण्याचा सल्ला दिला.
जम्मू-काश्मीरमधील संचारबंदीची स्थिती आणि सुधारीत नागरिकत्व कायद्यामुळे लाखो मुस्लिम भारत सोडून जाऊ शकतात. त्यामुळे शरणार्थींची नवीन समस्या निर्माण होईल असे इम्रान खान यापूर्वी म्हणाले होते. आम्हाला फक्त शरणार्थींमुळे निर्माण होणाऱ्या संकटाची भिती नाही तर, दोन अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये युद्धाची स्थिती उदभवण्याची आम्हाला चिंता आहे. आमच्या देशामध्ये आणखी शरणार्थींना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे त्यांनी जगाकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली,असेही त्यांनी नमूद केले होते.