कोल्हापूर(प्रतिनिधी) : शेतीसाठी दिवसा दहा तास वीज पुरवठा झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे.
दरम्यान या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या भावनेतून अज्ञाताने कागल येथील महावितरणचे कार्यालय पेटविले. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
महावितरणच्या कागल विभागीय कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालय पेटविण्याचा प्रकार घडला. कागल येथे राष्ट्रीय महामार्गालगत महावितरणचे कार्यालयआहे. कागल येथील छत्रपती शाहू कारखान्याच्या अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहचवून आग आटोक्यात आणली. दरम्यान, पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.