मुंबई – सत्ताधारी ठाकरे सरकारच्या येत्या काही महिन्यात पडणार असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत बोलताना तीन महिन्यांनंतर राज्यात सत्ताबदल होण्याचे संकेत दिले. यामुळे पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगलेला दिसून येत आहे.
सत्ताबद्दलच्या या मुद्यावरून ठाकरे सरकारच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारांशी बोलतांना संजय राऊत यांनी मुनगंटीवारांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले,’ विरोधी पक्षांनी आता पुढील साडे तीन वर्ष फक्त काम करावे सरकारची चिंता सुधीर मुनगंटीवार यांनी करू नये. ठाकरे सरकारच काम योग्य दिशेनं सुरू आहे.
ते पुढे मिश्किल अंदाजात म्हणाले,’लॉकडाऊननंतर नाटकाचे प्रयोग सुरु झाले असून काही निर्मात्यांनी मला मदतीसाठी फोन केले होते. मात्र त्या ठिकाणी मुनगंटीवारांचे नाटकाचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील. असं म्हणत राऊतांनी मुनगंटीवारांची मिश्किल अंदाजात टीका केली.