नवी दिल्ली – निवडणुकांनंतर जर बिगर रालोआ सरकार केंद्रात आले तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी पंधरा टक्क्यांनी कमी होऊ शकतो असा अंदाज युबीएस सिक्युरिटी या संस्थेने व्यक्त केला आहे.
निवडणुकाबाबत जाहीर झालेल्या जनमत चाचण्यांच्या आधारावर या संस्थेने काही अंदाज व्यक्त केले आहेत. जर बिगर रालोआ सरकार सत्तेत आले तर निफ्टी दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी होऊ शकतो. जर रालोआला 250 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर मोठ्या प्रमाणात अनिश्चितता निर्माण होऊ शकते. जर रालोआला 250 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर निर्देशांक पाच टक्क्यांनी वाढू शकतो
आणि जर भाजपाला मताधिक्य मिळाले तर निफ्टी पाच ते दहा टक्क्यांनी वाढू शकतो असे या संस्थेचे म्हणणे आहे.
शुक्रवारी गुंतवणूकदारांनी रालोआचे सरकार येईल या आशेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र या अगोदरच्या तीन एक्झिट पोल मधील अंदाज चुकले होते याची आठवण या संस्थेने करून दिली आहेत.