मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक पायाभूत सुविधा आणि किरकोळ कर्ज वितरण क्षेत्रात प्रवेश करण्याच्या शक्यतेवर विचार करीत आहे. त्यामुळे बॅंकेच्या कामकाजाचा विस्तार वाढेल, असे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॅंकेमध्ये काही गैरप्रकार झाल्यामुळे बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने प्रशासक नेमलेला आहे. प्रशासक म्हणून काम करणार आहे विद्याधर अनास्कर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आम्ही फक्त साखर कारखान्यांना का कर्ज द्यावे. हे साखर कारखाने अडचणीत आले तर बॅंकेचे काय होणार. त्यामुळे आगामी काळात आम्ही पायाभूत सुविधा आणि किरकोळ कर्ज वितरण करण्याच्या शक्यतेवर विचार करीत आहोत.
ते म्हणाले की, कर्ज वितरणासाठी आम्ही आगामी काळात वाहन कर्ज, गृह कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह पायाभूत सुविधांवर भर देणार आहोत. त्यामुळे ग्राहकांबरोबर राज्यांचाही विकास होण्यास मदत होणार आहे. बॅंकेच्या सध्या 57 शाखा आहेत. त्या वाढवण्याचा विचार आहे का असे विचारले असता विलीनीकरणाच्या माध्यमातून ती प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. सरलेल्या वर्षात बॅंकेला 316 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
गेल्या वर्षी बॅंकेला 201 कोटी रुपयाचा नफा झाला होता. बॅंकेचे 9.91% यावरून 7.35% वर आले आहे. बॅंकेचा कारभार पुन्हा निवडून आलेल्या संचालक मंडळाकडे कधी जाणार आहे असे विचारले असता ते म्हणाले की हे प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत आहे. त्यामुळे या विषयावर सद्याच्या परिस्थितीत भाष्य करणे बरोबर होणार नाही.