Modi government – नरेंद्र मोदी सरकार (Modi government ) केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर ते देशाला विनाशाकडे नेईल, म्हणूनच, भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व जुन्या समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असे केरळातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला (ramesh chennithala) यांनी म्हटले आहे.
चेन्निथला म्हणाले की, “भाजप तिसऱ्यांदा सत्तेत परतणार नाही, हे सुनिश्चित करण्याची गरज असून याच हेतूने कॉंग्रेसने इंडिया आघाडी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर देशाचा विनाश अटळ आहे असे ते म्हणाले.
देशाला ही वस्तुस्थिती समजली आहे आणि हा धोका टाळला पाहिजे, असे जनतेचे मत आहे. असे ते म्हणाले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी
रणनीती आखण्यासाठी पक्षाने बोलावलेल्या तातडीच्या बैठकीसाठी चेन्नीथलाल दिल्लीत आले आहेत. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठ्या विजयाची संधी आहे असेही ते म्हणाले.