लखनौ – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांच्या पक्षाने 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी स्थापन होणाऱ्या विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे आणि सरकार स्थापन झाल्यावर राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत. विरोधकांच्या ऐक्याबाबत सातत्याने चर्चा होत असताना त्यांनी हे वक्तव्य केल्याने या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे.
अहमद म्हणाले, “देशात दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत ही वास्तव बाब आहे. एक भारतीय जनता पक्ष आहे, तर दुसरा कॉंग्रेस आहे. तीन राज्यात कॉंग्रेसचे स्वबळावर सरकार आहे, तीन-चार राज्यात कॉंग्रेसचे युतीचे सरकार आहे. तसेच किमान 10 राज्यांमध्ये आम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहोत. राहुल गांधींनी देशाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे आणि पंतप्रधान व्हावे, अशी प्रत्येक कॉंग्रेस नेत्याची आणि कार्यकर्त्याची इच्छा आहे. त्यामुळे यावर अधिक चर्चा न करता सर्व प्रादेशिक पक्षांनी राहूल गांधींचे नेतृत्त्व मान्य करुन कामाला लागावे.
यूपीए सरकारचे माजी मंत्री अहमद म्हणाले, जर भाजपने सरकार बनवले तर त्यांच्याकडे पंतप्रधान असेल, परंतु जर कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी सरकार बनवले तर कॉंग्रेसचे राहुल गांधी हेच पंतप्रधान असावेत कारण हा नेता म्हणजे कॉंग्रेसचा आत्मा आहे.
Jammu-Kashmir : फारूक अब्दुल्लांचे मोदी सरकारला आव्हान “..तर मग काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घ्या”
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 21 फेब्रुवारी रोजी नागालॅंडमध्ये सांगितले होते की, पुढील वर्षी केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले जाईल, मात्र दुसऱ्याच दिवशी दिल्लीत त्यांनी मित्रपक्षांसोबत मिळून सरकार स्थापन केले जाईल, असे सांगितले. त्यामुळे नव्या वादाला निमंत्रण मिळाले होते.