नवी दिल्ली – मोदी सरकारचे वादग्रस्त कृषी कायदे आपली सत्ता असणाऱ्या राज्यांत रद्दबातल ठरवण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कृषी कायदेवरून शाब्दिक हल्ला चढवला दिसत आहे.
यातच, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पत्रकारांशी बोलतांना शाब्दिक हल्ला आहे. ते म्हणाले की,’या दोघांनी जर एखाद्या पिकाच्या पानावरुन ते पीक कोणतं आहे हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन असं आव्हान त्यांनी दिलं आहे. गांधी परिवाराकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.