मुंबई: भाजप नेते निलेश राणे सरकारवर टीका करीत आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा तिखट शब्दात टीका केली होती. दरम्यान आता त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे. तसेच त्यांनी पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले.
राणे म्हणाले, आदित्य ठाकरेचा मतदारसंघ जी साऊथ मुंबई मध्ये येतो. अचानक कंटेनमेंट झोनमधून ह्या वरळी भागाला वगळून सांगण्यात येतं की ९ दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळला नाही, हे खरं असेल तर आनंद आहे पण हा भाग फक्त आदित्यचा मतदारसंघ आहे म्हणून बातमी देऊन कोण झाकायचा प्रयत्न करत असेल तर तो अपराध होईल.
मालेगावात यल्लमा पुलावर शेकडोच्या जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. या घटनेचा एक व्हिडीओ शेयर करत राणे म्हणाले, पोलिसांना समोर लोकांची गर्दी दिसून सुद्धा पोलिस पुढे गेले नाही. ८० टक्के लोकांनी लॉकडाऊन का पाळावा? महाराष्ट्र पोलीस इतकी हतबल कधी पासून झाली? काय ते एकदा होऊन जाऊ द्या, वैताग आलाय रोज रोज पोलिस पळताना बघून.
आदित्य ठाकरेचा मतदारसंघ Gसाऊथ मुंबई मध्ये येतो. अचानक कंटेनमेंट झोनमधून ह्या वरळी भागाला वगळून सांगण्यात येतं की ९ दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळला नाही, हे खरं असेल तर आनंद आहे पण हा भाग फक्त आदित्यचा मतदारसंघ आहे म्हणून बातमी देऊन कोण झाकायचा प्रयत्न करत असेल तर तो अपराध होईल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 23, 2020