मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या पहाटे घेतलेला शपतविधी आजही संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि शिंदे गटावर असलेली अपात्रतेची टांगती तलवार यामुळे राजकारणात कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. अशात पुन्हा एकदा अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहे.
नवीन युतीचा फॉर्म्युला तयार होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात रंगत आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता दिसून येत आहे शिंदे गटाच्या नेत्यांकडून या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या जात आहे . जेव्हा शिंदे गटाने बंड केला त्यावेळी या बंडाचे कारण नेत्यांनी असे सांगितले कि, अजित पवार निधीवाटपात भेदभाव करत असे, आता अजित पवार भाजप प्रवेश करणार असल्यास सत्तेबाहेर पडणारा शिंदे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी जर भाजप प्रवेश केला, तर शिंदे गटाचं काय होणार? याबद्दल शिंदेंच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. गुलाबराव पाटील अजित पवारांना सोबत घेण्यास अनुकूल दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या संदर्भात गुलाबराव पाटील यांनी अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष असं विधानही केलं होत. तर आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत बसणार नाही असं आमदार संजय शिरसाट माध्यमांशी बोलतांना दिसून आले. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी तर अजित पवारांनाच शिंदे गटात येण्याची ऑफर दिली आहे.
अशात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंना म्हणाले की, ‘आमच्या गटातील लोकांच्या चालण्या, बोलण्यात तुम्हाला तसे जाणवले का? चलबिचल आणि चिंता करण्याचे काम आमच्या पक्षातील नेते करत नाही. तसेच महाविकास आघाडीतील नेते सरकार पडेल म्हणून तारखावर तारखा देऊन थकली आहे. पण, अजूनही सरकार पडलेले नाही आणि यापुढेही पडणार नाही. कारण, शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात भक्कमपणे उभे असल्याचा त्यांनी दावा केला.’ मात्र असे असले तर अजित पवारांच्या संभाव्य चर्चांवरुन शिंदे गटातच मतंमतांतरं आहेत.अजित पवारांवर निधीवाटपात भेदभावाचा आरोप करुन सत्तेबाहेर पडणारा शिंदे गट काय भूमिका घेणार. हे पाहण महत्वाचे आहे.