मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत तब्बल सव्वाशे तासांचे केलेले स्टिंग ऑपरेशन 29 वेगवेगळ्या पेनड्राइव्हमध्ये भरुन सादर केले. यादरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर विविध आरोप केले. राज्य सरकार पोलिसांचा गैरवापर करत आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
फडणवीसांच्या आरोपाबाबत विधानसभेतच उत्तर देणार असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे. त्याचवेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले की, जे काही आरोप झाले आहेत, ते पडताळले जातील आणि त्यानुसार गृहमंत्री सभागृहात उत्तर देतील.
देवेंद्र फडणवीसांचा आरोप
‘अलीकडच्या काळात पोलीस दलाचा गैरवापर हा सरकारी पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सरकार षडयंत्र करत असेल तर त्या लोकशाहीला अर्थ उरत नाही. आपला विरोधक संपवण्याचे षडयंत्र जर का सरकार करत असेल, तर या लोकशाहीचा उद्देश कधीच सफल होणार नाही.’