नवी दिल्ली – देशात करोनाचा थैमान थांबायच नाव घेत नाही. देशात करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत देशात अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. तसेच व्हेंटिलेटर्स देखील कमी पडत होते. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात करोना रुग्णांनाचा मृत्यू होत आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातला एक अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी रात्री माध्यमांशी बोलतांना सांगितला.
ते म्हणाले,“राज्यात जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता तेव्हा मी तब्ब्ल सात दिवस झोपलेलो नाही. माझ्या कडे माहिती यायची रुग्णालयातील ऑक्सिजन अवघ्या काही तासात संपणार आहे मग आम्ही सर्व ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायचो.’
‘मी त्या काळात स्वत: ऑक्सिजन टँकरच्या चालकांशी फोनवर बोलायचो. ते नेमके कुठपर्यंत पोहोचलेत, किती वेळ लागेल वगैरे माहिती घ्यायचो”, असं चौहान म्हणाले आहेत.