नवी दिल्ली : बिहारमधील जातीवर आधारित जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र आतापर्यंत काहीच उत्तर आले नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी वेळ दिला नसल्याने नितीश कुमार यांची नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड(जेडीयू)च्या खासदरांना या अगोदर पंतप्रधान मोदींसोबत बैठकीसाठी नकार देण्यात आला होता व सांगण्यात आले होते की त्यांनी या ऐवजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली पाहिजे.
नितीश कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “काळजी ही वाटते की जातीय जनगणनेचा काही लोकांना त्रास होईल, जे निराधार आहेत. तसेच, त्यांनी सांगितले आहे की, हे केंद्रावर अवलंबून आहे की जातीय जनगणना करायची की नाही…आमचं काम आपलं मत मांडणं आहे. हा नका विचार करू की एखाद्या जातीला हे आवडेल आणि दुसरीला नाही…हे सर्वांच्या हिताचेच आहे.”
तसेच, “त्यांनी माध्यमांना सांगितले की, समाजात कोणताही तणाव निर्माण होणार नाही. आनंद वाटेल…योजनांमुळे सर्व प्रवर्गांमधील लोकांना लाभ होईल.” अशी जनगणना ब्रिटिश सरकारच्या काळतही झाली होती.
मुख्यमंत्री नितीश कुमार असं देखील म्हणाले की, जेव्हा बिहार विधानसभने जातीवर आधारित जनगणनेच्या बाजून प्रस्ताव पारित करून, केंद्राला पाठवला तेव्हा कोणत्याही भाजपा आमदाराने कोणताच आक्षेप नोंदवला नाही. मग काही क्षेत्रातून आक्षेप का नोंदवले जात आहेत, हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.
स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यांनी युक्तिवाद केला होता की, जातीय जनगणना एक समान समजासाठी प्रतिकूल असेल, १९४७ पासून प्रत्येक जनगणनेत केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची गणना केली गेली आहे.