हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीबाबतचा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच नेपोटिझमचाही फटका अनेकांना बसलेला आहे. त्यातच प्रसिद्ध संगितकार ए. आर. रेहमान यांनी आपल्यालाही याचा फटका बसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
चित्रपटसृष्टीत एक गट कार्यरत असून त्यांच्या मर्जीतील लोकांनाच येथे काम मिळते. याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्नही काही लोकांनी केला. मात्र, त्यांना या क्षेत्रातून बाहेर ठेवले गेले. त्यांना कामही मिळेनासे झाले. मी जेव्हा नवोदित होतो, तेव्हा मला हा अन्याय सहन करावा लागला. मला एकही चित्रपट
मिळत नव्हता. तसेच छोटे कामही मिळत नव्हते. त्यावेळी हे सर्व माझ्याच बाबतीत का होत आहे, ते
देखील कळेनासे झाले होते, असेही रेहमान यांनी सांगितले.
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक असे बडे कलाकार, निर्माते व दिग्दर्शक आहे की ज्यांनी माझ्याबाबतीत अफवा पसरवल्या. माझी प्रतिमा डागाळण्याचेही अनेकदा प्रयत्न झाले. काही निर्माते मला भेटले तेव्हा त्यांना कोणीतरी मला काम देऊ नका असे सांगितल्याचेही मला समजले होते.
मात्र, या क्षेत्रात काही व्यक्ती चांगल्या आहेत व त्यांनी मला सातत्याने काम दिले.माझा मेहनतीवर व नशीबावर विश्वास असल्याने माझ्याकडे काम येत राहिले व लोकांनीही कामाचे कौतुक केले, असेही रेहमान यांनी सांगितले.