हैद्राबाद : हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज सकाळी तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चारही आरोपींचा खात्मा केला आहे. चौकशीसाठी पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आले त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी या चारही आरोपींना जागीच ठार करावे लागले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
Asha Devi, Nirbhaya’s mother: I have been running from pillar to post for the last 7 years. I appeal to the justice system of this country and the government, that Nirbhaya’s culprits must be hanged to death, at the earliest. https://t.co/VoT5iv2caf pic.twitter.com/5ICgJUYaNz
— ANI (@ANI) December 6, 2019
तेलंगणा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे त्यांचे कौतक केले जात आहे. तर निर्भायाच्या आईने दहा दिवसांत आम्हाला न्याय मिळाला, असे म्हणत पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या की, पीडितेच्या कुटुंबाला दहा दिवसांत न्याय मिळाला, आमच्याप्रमाणे हैदराबादमधील पीडित कुटुंबाच्या वाट्याला संघर्ष आला नाही, याचे समाधान आहे. असल्या गुन्हेगारांना अशीच शिक्षा केली पाहिजे. मात्र आपली न्यायव्यवस्था ही गुन्हेगारांना पोसत बसते. पोलिसांना अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे. अशाचं कारवाया करून असे गुन्हेगार संपवले पाहिजेत, असे म्हणत निर्भयाच्या आईने निर्भयालाही न्याय द्या, अशी मागणी केली आहे.
दरम्यान तेलंगणाच्या राजधानीजवळील शादनगर गावात 7 नोव्हेंबरला एक धक्कादायक प्रकार घडला होता. अज्ञात लोकांनी पशुवैद्यकिय महिला डॉक्टरवर बलात्कार करूनपीडितेला जिवंत जाळले होते. या घटनेनंतर दोषींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. त्यासाठी देशभरात आंदोलनं होतं होती. मात्र आज या आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तेलंगणा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे देशातून पोलिसांचे आणि तेलंगणा सरकारचे कौतूक केले जात आहे.