पिडीत पुरुषांसाठी आयोग स्थापन करण्याची मागणी
नवी दिल्ली- भारतीय संसदेने स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनेक ठिकाणी महिलांना मोठे आरक्षण आणि अन्य सुविधा दिल्या आहेत. शिवाय अनेक कायदे महिलांच्या बाजूने असल्याने स्त्रियांविषयी कोणतीही चुकीची गोष्ट करताना पुरुष दहावेळा विचार करतात. सामाजिक पातळीवर पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिले जाण्याची प्रक्रिया गेल्या काही दशकांत वेगाने झाली असली, तरी अनेकदा असे दिसून येते की, हजारो महिला त्यांना मिळालेल्या निसर्गदत्त आणि कायदेशीर अधिकारांचा गैरवापर करतात. अशा पत्नीने दिलेल्या त्रासामुळे वैतागलेल्या पतीदेवांनी जंतर-मंतरवर मोर्चा काढत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
“पुरुष हक्क संरक्षण समिती’
पुण्याहून सातारला जाताना अतित येथील बसस्थानकावर लावलेला एक फलक जाणारा-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतो. सांगली येथील एका संस्थेचा हा फलक असून त्यावर “पुरुष हक्क संरक्षण समिती’ असे शब्द आहेत. अधिक तपशीलामध्ये ज्या पुरुषांना घरात पत्नी, अथवा तिची आई, कार्यालयातील महिला सहकारी अथवा अधिकारी आणि समाजात अन्य कोणाही महिलेकडून त्रास दिला जात असेल, तर सदर संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन या फलकावर करण्यात आले आहे. तसेच अशा स्त्री-पिडीत पुरुषांना मोफत कायदेविषयक सल्लाही देण्यात येतो. तसेच (हॅशटॅग़)ही-टु अशी मोहिमही चालवण्यात येते.
पत्नीला त्रास दिल्यावर त्यासाठी पोलिस, महिला आयोग, न्यायालयबरोबर अनेक संस्था आहेत. मात्र पतींना त्रास देणाऱ्या आणि त्यांना खोट्या प्रकरणात अडकवल्यावर अशा पतींसाठी कोणताही पुरूष आयोग नाही. याच मागणीसाठी बुधवारी देशभरातून आलेल्या हजारो पीडित पतींनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शेने केली. त्यांनी सरकारकडे पीडित पुरूषांसाठी पुरूष आयोग बनवण्याची मागणी केली आहे.
अनेक पीडित पुरूषांनी सांगितले की, कुटुंबामध्ये माहेरच्यांकडच्या लोकांचा हस्तक्षेप बंद होणे गरजेचे आहे. 80 टक्के प्रकरणात लग्न तुटण्यास माहेरच्यांकडच्या लोकांचा हस्तक्षेप कारणीभूत असतो. बंगळुरूमधील आयटी कंपनीत सेल्स मॅनेजर मनप्रीत सिंह भंडारी यांनी सांगितले की, वर्ष 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले होते.
मात्र काही दिवसांमध्येच कौटुंबिक भांडणे होण्यास सुरूवात झाली. भांडणे एवढी वाढली की, लग्न टिकूच शकत नाही. आता पत्नी न सांगता 15 महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी गेली आहे. तसेच तिने आईच्या सांगण्यावरून अनेक खोट्या तक्रारी देखील दाखल केल्या आहेत. अशाच प्रकारची कारणे अनेक पीडित पतींनी सांगितली.
पुरुषांना हक्क पाहिजे पत्नी चा घरची लोक हस्तक्षेप करतात आणि पुरुषांना त्रास पत्नी नवरयाच ऐकत नाही माहेरच ऐकते
त्या साठी पोडगी बंद होयला पाहिजे