नवी दिल्ली: चक्रीवादळ अम्फान सध्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर सुंदरबनजवळून जात आहे आणि संध्याकाळपर्यंत कोलकाता येथे पोहोचेल. पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये 160 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहू लागले आहेत, असे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी बुधवारी सांगितले.
ते म्हणाले, “चक्रीवादळ अम्फानचा पुढचा भाग पोहचला आहे. वादळाचा मध्य भाग कोणत्याही वेळी पोहोचू शकतो. वादळ दुपारी अडीच वाजता घनदाट ढगांसह जमीनीवर आदळू लागले. वादळाचा मध्य भाग (आय ऑफ़ स्टॉर्म) चा व्यास सुमारे 40 किलोमीटर आहे आणि वादळ पूर्णपणे पोहोचण्याची प्रक्रिया तीन ते चार तासांत पूर्ण होईल.
चक्रीवादळ अम्फान संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वादळ पूर्णपणे ठोठावेल. हा वादळाचा अंदाज अचूक आहे. भारत बांगलादेशला वादळाचा इशाराही दिला असल्याचे, महापात्र म्हणाले.