Hina Rabbani Khar : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारताच्या वाईट वर्तनाचा आता अनेक देश थेट अनुभव घेत आहेत. आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा देशांतर्गत न्यायालयाप्रमाणे वापर करून भारताने लज्जास्पद कृत्य केले आहे.असे हिना रब्बानी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी ट्विटरवर या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी, “भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ठराव आणि काश्मीरवरील आंतरराष्ट्रीय दायित्वांकडे दुर्लक्ष करून चुकीचे निर्णय घेत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांकडेभारत पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे.” असा आरोप त्यांनी आपल्या पोस्टमधून केला.
पुढे बोलताना हिना रब्बानी म्हणाल्या,” मला आठवण करून द्यायची आहे की भारताने जम्मू-काश्मीरचा निर्णय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत घेतला होता. याबाबत ज्ञान देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी पुढे बोलताना,” संपूर्ण राज्याच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या भविष्याबाबत केलेली कोणतीही देशांतर्गत कारवाई वैध नाही.” असेही त्यांनी म्हटले.
5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयातून पाकिस्तान अद्याप सावरला नव्हता, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा काल महत्वपूर्ण निर्णय दिला, ज्यामध्ये त्याने कलम 370 हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. पाकिस्तानचे विद्यमान परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वक्तव्य केले होते. भारताचा निर्णय पाकिस्तानला मान्य नाही, असे ते म्हणाले होते.