Lok Sabha Election 2024 । देशातील सर्वात लोकप्रिय वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अखिल भारत हिंदू महासभेच्या उमेदवार हिमांगी सखी या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत आहेत. त्या म्हणतात की,’मी गंगापुत्र पीएम मोदींसमोर शिखंडीसारकाखी उभी राहिली आहे.तृत्तीय पंथांच्या हक्क मिळवण्यासाठी लढणार आहे. त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहे.
निवडणूक प्रचारासाठी वाराणसीत पोहोचलेल्या हिमांगी सखी यांनी सांगितले की,’महासभेने त्यांना येथून उमेदवारी दिली आहे. त्या कम्युनिटीचेही प्रतिनिधित्व करत आहे. लोकसभेत तृतीय पंथांसाठी जागा राखीव असत्या तर आज त्यांना हे सर्व करावे लागले नसते.
त्या पुढे म्हणाले की,’अखिल भारत हिंदू महासभेच्या चक्रपाणी महाराजांनी त्यांना संधी देऊन जे काम केले, तेच काम देशातील राजांनी केले असते तर समाजात आम्हाला पुढे नेण्यात आणि वाढवताना खूप आनंद झाला असता. संसदेत त्यांची मते निवडली गेली आहेत. जर तृत्तीय पंथांच्या समाजाचाच एक भाग आहेत तर आपल्या देशातील राजे गप्प का बसले आहे ? आम्हाला मुख्य प्रवाहात का आणत नाहीत ? मोदी सरकार सत्तेवर येऊन 10 वर्षे झाली, तरी आजही तृत्तीय पंथी समाज भीक मागत आहे?
माझा पहिला मुद्दा लोकसभा आणि विधानसभेत आमच्यासाठी प्रत्येकी एक जागा राखीव ठेवण्याचा आहे. याशिवाय तृतीय पंथी समाजाचे प्रबोधन करणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, तृतीय पंथीचे शिक्षिण करणे हाही अजेंडा असणार आहे. आमचे शिक्षण झाले असते तर आम्हाला रस्त्यावर भीक मागायला जावे लागणार नाही.’ असेही त्यांनी सांगितले.