जळोची – नुकत्याच झालेल्या पावसाने सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना पुराने वेढले. येथील पूरग्रस्तांची झालेली दयनीय अवस्था पाहून महाराष्ट्रातील थोरा मोठ्यांसह लहानग्यांचीही मनं हळहळली. थोरांसह लहानग्यांच्या संवेदना किती तीव्र आहेत, हे राज्यातील ठिकठिकाणच्या लहानग्यांनी केलेल्या मदतीच्या कृतीतून दिसून आले आहे.
समाजाचे आम्ही ही काही देणे लागतो, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून बारामती येथील भक्तिवेदांत जीवन शिक्षण गुरुकुलमधील लहानग्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या राख्या विकून दहा हजारांची पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे. पश्चिम महाराष्ट्रील सांगली, कोल्हापुर व सातारा येथील पुरपरिस्थिती आता पुर्ववत होत आहे.
पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यभरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे आपआपल्या परिने हातभार लावत आहेत. बारामती येथील गुरुकुल मध्ये शिक्षण घेत असणा-या नर्सरी ते चौथीच्या विघार्थ्यांनी आपल्या गुरुंशी हितगुज करुन गुरु शिष्यांच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी म्हणूनच नव्हे तर आपण ही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून पुरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवून रक्षा बंधणाच्या निमित्ताने आपल्या ईवलुशा हातांनी सुरेख राख्या बनवून त्या मंदिरे, मॉल, गार्डन, बाजारपेठ आदी शहरातील वर्दळीच्या नऊ ठिकाणी स्टॉल लावून विकल्या. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या लहान मुलांनी बनवलेल्या राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
ईवलिशी मुलं 10 हजार राख्या विकून मिळणारी रक्कम पूरग्रस्तांना मदतीच्या स्वरुपात देणार असल्याने राख्या खरेदी करताना नागरिक मुलांचे मनभरुन कौतुक करीत होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या लहाग्यांनी राबवलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून राखीव उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांच्यात विद्यार्थी दशेतच व्यवहारिक ज्ञानात भर पडावी, या हेतूने विद्यार्थ्यांकडूनच राख्यांची विक्री केली.
-प्राची चाकूरकर, प्राचार्यराखी विक्री उपक्रमातून लहान वयातच आमच्या व्यवहारिक ज्ञानांसह राखी विक्रीतून मिळणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिल्याचे समाधान वाटते.
-वेदांत सुभेदार, विद्यार्थी