चिंबळी -खेडच्या दक्षिण भागात गुरुवारी (दि. 25) सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आनंदीत तर उकाड्यापासून सुटका झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात चक्री वादळामुळे वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावले होती. त्यामुळे चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, वाल, मूग, उडीद, चवळी व इतर पिकांची पेरणी करण्यात आली होती;परंतु त्यानंर पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली होती.
त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले होते. त्यातच दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता तर गुरूवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने खरीपातील पिकांसह भातरोपांना जीवदान मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.