विद्यार्थ्यांचा केला सत्कार
कोपरगाव (प्रतिनिधी) – प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाची किंमत होऊच शकत नाही. आपण कोणत्या परिस्थितीतून आलो, याचा विचार न करता आपल्याला जे निश्चित उद्दिष्ट साध्य करायचे आहे, ते सातत्याने डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल केल्यास यशाचे शिखर सहज गाठता येईल, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील नवोदय परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा आमदार काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, जि. प. सदस्य सुधाकर दंडवते, कारभारी आगवण, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, रोहिदास होन, राहुल जगधने, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, प्रसाद साबळे, सांदू पठाण, आर. के. ढेपले, किशोर निळे, विद्या भोईर, आत्मा मलिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निरंजन डांगे आदींसह पालक, शिक्षक उपस्थित होते.
आ. काळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शब्दांच्या पलीकडले आहे. विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या पालकांचा व गुरुजनांचा देखील मोठा वाटा आहे. खासगी शाळांच्या बरोबरीत जिल्हा परिषदच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी देखील नवोदय परीक्षेत मिळविलेले यश म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा कोणत्याच बाबतीत मागे नाहीत, याचे द्योतक आहे. यावेळी गोकुळ पाचोरे, शशिकांत पाचोरे, राजेंद्र पाचोरे, पोपट जोंधळे उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतील दुर्गेश हरिभाऊ ठाणगे, सार्थक नवनाथ लडकत, नीलम कचेश्वर खंडीझोड, सिद्धांत विलास महिरे, कोकमठाण येथील आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील भाग्यश्री संतोष सोनवणे, दीक्षा जयवंत गावित, दुर्गेश ज्ञानेश्वर चव्हाण, करण पुंडलिक चौधरी, गौरव सुनील पाटील, निखिल गणेश गायकवाड, तसेच महर्षी विद्या मंदिरातील समृद्धी बाळासाहेब गुंजाळ या विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली आहे.