गडचिरोली – राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून मेडीगड्डा प्रकल्पात तब्बल 16 लाख पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हा आतापर्यंतचा राज्यातील विक्रमी विसर्ग ठरला आहे. यामुळे गोदावरी नदी काठावर हाय अलर्ट देण्यात आला आहे.
रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत धरणाचे सर्व 85 दरवाजे उघडण्यात आले असून 16 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर हा मेडीगट्टा प्रकल्प आहे.