Heavy Rainfall : राज्यात यंदा पावसळ्यात म्हणावा तेवढा समाधानकारक पाऊस पडला नाही मात्र आता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते आतापर्यंत राज्यात दिसालादायक पाऊस पडत आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्यात कमी वेळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
येत्या 12 तासांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यामध्ये सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे तसेच घाट क्षेत्रांचा समावेश आहे. काही ठिकाणी कमी वेळात जास्त पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे झाड उन्मळून पडणे, दरड कोसळणे, डोंगरांवरून माती वाहून येण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. तर दुसरीकडे राज्यातून नैऋत्य मान्सून (Monsoon) आठवड्याच्या शेवटी परतण्यास अनुकूल वातावरण निर्मिती झाली आहे.
राज्यात एकूण सरासरीच्या 97 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर 10 ऑक्टोबरनंतर मुंबईतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. राज्यात पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कायम आहे. परंतु, यंदा राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट पाहायाला मिळत आहे.