कोपरगाव – कोपरगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी पावने सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात आवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळं शेतकरी पुन्हा एका एकटात आडकला आहे.
करोना संसर्गामुळे संपुर्ण देश हादरुन गेला असून या महामारीपासुन बचाव करण्यासाठी नागरीकांना घराबाहेर न पडण्याचू आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शेतात काढणीसाठी आलेले पिके कापण्यासाठी शेतमजूर मिळत नाहीत, अपेक्षीत साधनसामुग्री उपलब्ध होत नाही वाहतूक बंद झाली. वाहनांसाठी इंधन मिळेना. शेतीतला भाजीपाला बाहेगावी विकता येत नाही. संपुर्ण बाजारपेठ ठप्प झाल्याने आर्थीक उलाढाल मंदावली. करोनाचे वातावरण शांत झाल्यानंतर शेतातील उभे पिक काढून त्याच्यावर दोन पैसे मिळण्याच्या आशेने बसलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने अवकृपा दाखवत पावसाच्या माध्यमातून उभे पिके भुईसपाट केले. शेतकऱ्यांचा निसर्ग किती अंत पहात आहे.
दरम्यान, करोनाच्या भितीने घरात बसलेल्या शहरवासीयांना वाढलेल्या उष्णतेचा त्रास सक्षन करावा लागत होता. बाहेर जाण्यास व बसण्यास बंदी असल्याने गरमीने गदरमलेल्यांना अचान आलेल्या पावसाने आल्हाददायक वातावरण निर्माण केले. आवकाळी पावसाने कांहीच्या शरीराला गारवा मिळाला पण शेतकऱ्यांच्या पोटाला आग लागली आहे.