पेठ (प्रतिनिधी)- पेठ ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक असणारी दुकाने,किराणा माल इत्यादी बाजार उपलब्ध व्हावा व कोरोना साथीचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी गावातील प्रत्येक दुकान,पतसंस्था, बँका ,मेडिकल दुकानाच्या समोर दोन मीटर अंतरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी रंगीत चौकट तयार केल्या आहेत.याद्वारे अत्यावश्यक सेवांचा लाभ घेऊन कोरोना चा फैलाव होणार नाही.अशी व्यवस्था ग्रामपंचायत व महसूल विभागाने केली आहे.
कोरोना विषाणूंच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहे . एक-दुसऱ्यापासून दूर राहणे (सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक दुरावा), घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास नागरिकांना जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असे कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात एकच झुंबड उडाली. स्थानिक प्रशासनाकडून याबाबत खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत.
जगभरातील शक्तिशाली देश प्रयत्न करून कसे असहाय झाल्याचे आणि आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचा हवाला देत तमाम भारतवासीयांना ‘लॉक डाऊन’चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही भाजीपाला, किराणा दुकानात नागरिकांच मोठी गर्दी होताना दिसून येतं आहे.
पेठ येथील स्थानिक प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या वतीने यावर नामी तोडगा काढण्यात आला आहे. गावातील आठ ते नऊ किराणामालाची दुकाने मेडिकल्स भाजीपाल्याची दुकाने पतसंस्था बँका या सर्वांच्या पुढे सफेद फक्की ने सुरक्षित अंतरावर लोकांसाठी सफेद चौकट तयार करण्यात आले.
जेणेकरून त्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राहील आणि दुकानदार मेडिकलवाले बँक यांनाही आपलं काम करणे सुलभ होईल आणि करण्याचा प्रसारही वर कमी होण्यास मदत होईल हा उद्देश यामागे आहे. याकामी महसूल विभागाचे गावकामगार तलाठी हेमंत भागवत ,गाव कामगार कोतवाल संदीप तोत्रे ,ग्रामपंचायत सदस्य अशोक राक्षे, बाळासाहेब रागमहाले, ग्रामसेवक मोहम्मद चौगुले, भाऊसाहेब,लेखनिक सलीम तांबोळी, शाहरुख पटेल आदींनी सहभाग घेतला होता.