Harbhajan Singh : पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी अवघ्या 3 विकेट्सवर शरणागती पत्करली. या कसोटीत भारताची फलंदाजी किंवा गोलंदाजी कामी आली नाही. या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने संघातील युवा खेळाडूंवर अधिक विश्वास व्यक्त केला. तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांसारख्या कसोटी क्रिकेटमधील बड्या खेळाडूंना या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. यावरून अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) देखील संताप व्यक्त केला आहे.
पहिल्या डावात केएल राहुलने शतक निश्चित केले पण ते पुरेसे नव्हते, तर दुसऱ्या डावात कोहलीने अर्धशतक झळकावले पण त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. या पराभवानंतर हरभजन सिंगने म्हटले आहे की, पुजाराला संघातून का वगळले हे समजू शकत नाही. पुजारा नक्कीच हळू खेळतो पण तो तुम्हाला सामन्यात वाचवतो. पुजाराला कोणतेही कारण नसताना वगळण्यात आले. क्रिकेटमध्ये सध्या भारताकडे त्याच्यापेक्षा सरस फलंदाज नाही.”
पुढे हरभजन म्हणाला की, भारतीय संघातील विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोन खेळाडूंनी सर्वत्र धावा केल्या. मागील विक्रमावर नजर टाकल्यास विराट कोहलीचे योगदान पुजाराच्या बरोबरीचे होते. मला समजत नाही की त्याला बाहेर का टाकले? आमच्याकडे अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये पुजारापेक्षा चांगला फलंदाज नाही. त्याच्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये मालिका जिंकल्या आहेत.”
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया दुसरी कसोटी जिंकून मालिका जिंकू शकत नाही पण बरोबरी नक्कीच करू शकते.