Ashok Chavan| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. ‘अबकी बार 400 पार’चा आकडा गाठण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यात अनेक नेते सभांद्वारे विरोधी पक्षावर टीका करत आहेत. यातच भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका सभेत बोलताना विरोधी पक्षावर सडकून टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना थेट राज्यसभा खासदारकी मिळाली.
काय म्हणाले अशोक चव्हाण? Ashok Chavan|
यानंतर अशोक चव्हाण यांनी एका सभेत ‘भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात पाच वर्ष बोंबलत बसलो असतो’, असा टोला काँग्रेसला लगावला आहे. “देशातील ८० ते ९० टक्के लोकांच्या मनामध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर माझ्या मनातदे खील दुसरे कोणी असण्याचे कारण नाही. त्यामुळे मी हा धाडसी निर्णय घेतला. भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर मी पाच वर्ष विरोधात राहिलो असतो. दिल्लीत आमचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय करायचे? विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”, असे अशोक चव्हाण म्हणाले.
नुकतेच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांच्या यादी जाहीर केल्यानंतर स्टार प्रचारकांची यादीही भाजपाने जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांचे देखील नाव आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधून भाजपात आलेले अशोक चव्हाण काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत.
महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यांत Ashok Chavan|
देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यांत होणार आहे. यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी प्रचार सभेला सुरुवात केली आहे.
हेही वाचा:
तिकीट नाकारल्याने खासदाराने उचललं टोकाचं पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू